पाकिस्तानचा शेअर बाजार गडगडला   

सर्वात मोठी घसरण 

इस्लामाबाद : पाकिस्तानावरील भारताच्या हवाई हल्ल्यानंतर  तेथील शेअर बाजार बुधवारी सकाळी उघडताच जमीनदोस्त झाला. कराची बजाराचा निर्देशांक केएसई-१०० मध्ये अचानक ६ हजार पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. 
 
भारताच्या हवाई हल्ल्यामुळे नागरिकांसह गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. शेअर बाजारातही पुरता गोंधळ उडाला. काल निर्देशांक केएसई १०० हा तब्बल सहा हजार अंकांनी किंवा सुमारे सहा टक्क्यांनी घसरला. तो १,१३,५६८.५१ वरून १,०७,२९६.११ च्या पातळीवर घसरला. ही घसरण २०२१ नंतर सर्वात मोठी ठरली आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी भारताने आणखी कारवाई केली नाही तर, पाकिस्तानही ती करणार नाही, असे सांगितले. त्यांच्या विधानानंतर बाजारातील घबराट कमी झाली आणि तो कहीसा सावरला.

पहलगाम हल्ल्यानंतर ११ हजाराने घसरण

तेल आणि वायू तसेच सिमेंट कंपन्यांच्या समभागांमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून, केएसई-१०० मध्ये घसरण होत आहे आणि आतापर्यंत तो ११ हजार हून अधिक अंकांनी तो घसरला आहे. गेल्या आठवड्यातच पाकिस्तानी शेअर बाजार ७ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. २२ एप्रिल रोजी, पहलगाम हल्ल्याच्या दिवशी तो १,१८,३८३.३८ वर बंद झाला होता.
 

Related Articles